सर्व वर्तमानपत्रे बंदच झाली तर | vartamanpatre band zali tar

सर्व वर्तमानपत्रे बादच झाली तर | vartamanpatre band zali tar. वर्तमानपत्रे बंद झाली तर ...
Admin

 
सर्व वर्तमानपत्रे बंदच झाली तर...


सर्व वर्तमानपत्रे बादच झाली तर | vartamanpatre band zali tar
   
सर्व वर्तमानपत्रे बादच झाली तर | vartamanpatre band zali tar



📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄


            मोबाईलची काय करामत आहे बघा ! मोबिल क्रांतीच ही! मोबाईल चे उपयोग सांगण्याची गरजच नाही इतके ते आत्ता सगळ्यांना माहित झाले आहेत. कल्पनातीत गोष्टी घडत आहेत. पत्र व पोस्टमन यांना मोबाईल ने केव्हाच इतिहासजमा केले आहे. आत्ता वर्तमानपत्रांची पाळी येईल, असे वाटते. वर्तमान पत्रांतून मिळणाऱ्या सर्व गोष्टी आत्ता मोबाईलवरूनही मिली लागल्या आहेत आणि अत्यासुद्धा व्हिडीओसहित . अगदी विनामूल्य ! मग वर्तमानपत्रे विकत घेल तरी कोण आणि कशासाठी? खारक, अशा प्रकारे वर्तमानपत्रे बंद झाली तर काय होईल?  काय परिणाम होतील ? माझ्या मते, फार खोलवर परिणाम झालेले आपल्याला पहावयास मिळतील.

मी आमदार झालो तर... 

            छापील वर्तमानपत्रांत बातम्या असतात त्या आदल्या दिवसाच्या. आपल्याला कळेपर्यंत काही अवधी जातो. आपले एकही मत बनते पं तोपर्यंत प्रत्यक्ष घटनेत पुढे कितीतरी बदल झालेला असतो. त्यामुळे कधी-कधी विपरीत परिणामही जाणवतो. इलेक्ट्रोनिक माध्यमातूनबातम्या त्वरित कळतात. त्या एका क्षणात जगभर पसरतात. तसेच छापील वर्मान्पात्रांत वाचकांच्या प्रतिसादाला फारच मर्यादित जागा असते. एक लाख खप असलेल्या वर्तमानपत्रातही चारपाच वाचकांना प्रतिक्रिया नोंदवता येते. इलेक्ट्रोनिक माध्यमात मात्र प्रत्येकजण मत नोंदवू शकतो. वर्तमानपत्रे बंद झाली, तर इलेक्ट्रोनिक माध्यमे त्यांची जागा घेतील.


            इलेक्ट्रोनिक माध्यमे पाटेक क्षणाला अपडेट होण्यासाठी सिद्ध असतात. वाचक कोणत्याही काशनी आपली प्रतिक्रिया नोंदौ शकतो. ही प्रतिक्रिया काही क्षणात जगभर पसरते. त्यामुळे महत्वाच्या घटनाचे तत्काळ पडसाद उमटतात . माहितीगार वाचक आपल्याकडील खरीखुरी माहिती त्वरित  उघड करतो. सत्य लवकर प्रकट होण्यास मदत होते. अनेकांच्या चुका, बेजबाबदार वागणे, गुन्हे व घोटाळे त्वरित उघड होतात आणि सर्वत्र पसरतात . राजकारणी लोकांना याचीच कायम भीती वाटत असते.

मला पंख असते तर...

            छापील वर्तमानपत्रे बंद झाली तर काही फायदे होतील यामध्ये काही शंका नाही; पण नुकसान ही होईल. इलेक्ट्रोनिक मध्यम गतिमान आहे. तेथे सर्व प्रसिद्धी झटपट होते. झटपटपणा हा त्याचा अंगभूत गुण आहे. त्यामुळे त्यातील बातम्यांना वर्वार्चेपणा व तात्पुरातेपणा येणाचा धोका आहे. बातमी वाचल्यावरही ती कहरी आहे की खोई आहे, असा संशय येत राहील. त्यामुळे त्यातील बातम्यांना वर्वार्चेपण व तात्पुर्तेपणा येण्याचा धोका आहे. बातमी वाचल्यावरही ती खरी आहे की खोटी आहे, असा संशय येत राहील. त्यामुळे बातम्यांची विश्वासार्हता कमी होईल. विश्वासार्हता. बातम्या वाचण्याची मानसिक गरज पूर्ण होणार नाही. परिसरातील घटनांचे यथायोग्य चित्रण मिळणार नाही.


            इलेक्ट्रोनिक माध्यमातील बातम्यांत आपल्याला दृश्य दिसते व निवेदन ऐकू येते. त्यामुळे या बातम्या प्रभावी वाटतात. पण त्या दिसतात आणि क्षणार्धात लुप्त होतात. त्याच्न्हे अस्तित्व क्षणभंगुर असते. त्या तुलनेत वर्तमानपत्रांतील  बातम्या जास्त काळ टिकून राहतात. गरज असेल, तेव्हा त्या पुन्हा वाचता येतात. इलेक्ट्रोनिक माध्यमातील बातम्या फक्त स्मरणातच . त्यांना स्मरणाबाहेर अस्तीस्त्व नसते. वर्तमानपत्रे बंद झाली तर सामान्य माणसाला एखादी बातमी पुन्हा तपासून पहायची संधी मिळणार नाही.

परीक्षा नसत्या तर...

            वर्तमानपत्र पुन्हा पुन्हा वाचता येते.वाचता वाचता पुढे आपण अदखळलो , तर पुन्हा मागे येऊन वाचता येत. मागच्या पुढच्या संदर्भाची तुळणी करून पुन्हा पुन्हा वाचता येते. या तऱ्हेने मनातले बातमीचे चित्र स्पष्ट व पूर्ण होते. वात्मंपते बंद झाली तर या कायद्याला आपण वंचित होऊ आणि आपल्या भोवतालाविषयीचे बातम्यांतून होणारे आकलन अस्पष्ट होईल. आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवरही याचा परिणाम होईल. वर्तमानपत्रे बाद झाली, तर हे खूप मोठे नुकसान होईल.


            वर्तमानपत्र स्वतःच्या वेळात, कुठेही, केव्हाही, हवे तिथे, हवे तसे वाचता येते. डोंगरदर्यांत , झोपडीत, महालात कुठेही ! ते उभ्या उभ्या किंवा अंथरुणावर आरामात पहुडून असे कोणत्याही रीतीने वाचता येते. वर्तमानपत्रे बंद झाली तर, वाचकांना मिळणारी ही सुविधा लुप्त होईल.

कल्पनात्मक निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ? 

            वर्तमानपत्रे बाद झाली तर काय होईल, याचा आपण विचार करीत आहोत. पण मला असे वाटते, हा विचार करावाच कशाला कारण माणूस वर्तमानपत्रे मुळीच बंद होऊ देणार नाही.

 

📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄


मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा👇

 

[मुद्दे:

वर्तमानपत्रे बंद झाली तर हा विचार मनात आणणारा प्रसंग – वर्तमानपत्रामध्ये आदल्या दिवसापर्यंतच्याच बातम्या – वाचकांच्या प्रतिसादाला मर्यादित जागा – ताज्या ताज्या घडामोडींच्या समावेशाने इलेक्ट्रोनिक माध्यमे सत्य लवकर जगासमोर आणतात – बातम्यांची विश्वासार्हता कमी होण्याचा धोका – बातमी पुन्हा तपासून पाहण्याची संधी मिळणार नाही – बातम्यांचे स्पष्ट आकलन होण्यास मदत – वर्तमानपत्र कुठेही वाचता येते – वर्तमानपत्रे बंद होणे अशक्य.] 


 📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄

 

हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

 वर्तमानपत्रे बंद झाली तर निबंध मराठी 

vartmanpatre band zali tar niband in marathi

vartamanpatre band zali tar essay in marathi.

 

 📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄


  • निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा. 
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू. 
  • वर्तमानपत्रे बंद झाली तर या विषयावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला  नक्की COMMENT द्वारे कळवा.

📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄

धन्यवाद


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.