BUY PROJECT PDF Click Here!

पाऊस पडलाच नाही तर... | Paus padlach nahi tar.... marathi nibandh

पाऊस पडलाच नाही तर... पाऊस पडलाच नाही तर कल्पनात्मक निबंध मराठी निबंध पाऊस पडलाच नाही तर मराठी निबंध Paus padlach nahi tar… Paus padlach nahi tar kal
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

पाऊस पडलाच नाही तर...


        २०१९ या वर्षातली झालेली अतिवृष्टी आठवली की आजही अंगावर काटा उभा राहतो. रिमझिम सुरु असलेल्या पावसाने अचानक जोर धरला . दोन – तीन दिवस झाले तरीही पाऊस काही कमी होत नव्हता. सर्व नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले. पाणी साठवण्यासाठी नद्यांवर बांधलेली सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली. नद्यांचे पाणी इतके वाढले की त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नदीकाठी वसलेल्या आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणवर पाणी शिरले. लोकांच्या घरांत पाणी शिरले. शेतीचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले. शेतकऱ्यांनी साठवलेले धन्य पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. पुराच्या पाण्यामुळे अनेक नद्यांवरचे पूल वाहून गेल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटल पुराच्या पाण्यात हजारो मुक्या जनावरांचा जीव गेला. त्याच बरोबर शेकडो माणसे मृत्यमुखी पडली. बचार्कार्य करता करता स्थानिकांचे पुरते हाल झाले. शेवटी बचावकार्य करण्यासाठी लष्करातील विशेष तुकड्यांना पाचारण करण्यात आले. किंकाळ्या, कित्येकांचे आक्रोश किती भायावह दृश्य! ते दिवस पुन्हा आठवले की असे वाटत नको तो पाऊस. पाऊस पडलाच नाही तर... किती बरे झाले असते.



पाऊस पडलाच नाही तर... | Paus padlach nahi tar.... marathi nibandh

पाऊस पडलाच नाही तर... | Paus padlach nahi tar...




        पाऊस पडलाच नाही, तर हा विचार माझ्या डोक्यात आला आणि मी त्यावरच विचार करू लागलो पाऊस पडला नाही तर काय होईल यावर मी माझ्या कल्पनांचे बांध बांधू लागलो. मोठ्या प्रमाणवर पाऊस पडल्याने. शेतीचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होतेच पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणवर जीवित व वित्तहानी सुद्धा होते जर पाऊस पडलाच नाही तर पावसामुळे होणाऱ्या या नुकसानापासून सर्वाची सुटका होईल.


        पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरातून बाहेर पडल्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले असते. रस्त्यावर, बागेत अगदी सर्वच ठिकाणी. अचानक पाय चिखलात जातो आणि चप्पल चिखलातच रुतून बसते. कधी कधी तर निसरड्या चिखलावरून पाय सरकतो आणि आपला तोल जाऊन धपकन चिखलात पडतो . मग तर या चिखलाचा खूपच राग येतो. जाता येत रास्यावरच्या चिखलाचा त्रास सहन करावा लागतो. पाऊसच नसता तर मग चिखल होण्याचा प्रश्नच उद्भवला नसता आणि चिखलापासून आपली सुटका झाली असती.


        सतत पडणाऱ्या पावसामुळे गटारे तुडुंब भरून वाहू लागतात आणि दरवर्षी प्लास्टिक कचरा गटारात अडकून गटारे तुंबतात आणि गटारातील डागले घन पाणी रस्त्यावर येते. सगळीकडे दुर्गंधी पसरते. चिखलाचे साम्राज्य पसरले जाते साचून राहिलेल्या पाण्यामध्ये दासांची पैदास होते आणि डेंग्यू, मलेरिया यांसारखे साठीचे आजार पसरतात. अनेकवेळा तर गरारांचे पाणी पिण्याच्या जलस्त्रोतांत मिसळल्याने. हगवण , कॉलरा यांसारख्या रोगांची लागण होते. पाऊस पडलाच नसता तर ही परिस्थिती कधी उद्भवलीच नसती या समस्यांना तोंड देण्याची वेळ कधी माणसांना आलीच नसती. पाऊसच पडला नसता तर पुरामुळे होणारी अपरिमित हानी सुद्धा झाली नसती. कोणाचे नुकसान होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली नसती.


        आत्तापर्यंत पहिली ती  तर या समस्येची एक बाजू होती. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला. तर पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याअभावी पिके येणार नाहीत. परिणामी अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाणार नाही. शेतजमिनीचे वाळवंट होऊन जाईल . शेती हा प्रकारच या धरतीवर उरणार नाही.  पावसापासून मिळणारे पाणी हे मोठ मोठ्या धरणांमध्ये साठवेले  जाते आणि त्या पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती केले जाते . जर पाऊसच पडला नाही तर ही पाणी येणार कोठून? सर्व धरणे आतून जातील परिणामी वीजनिर्मिती होणार नाही. आपल्याला अंधारमय जीवना जगावे लागेल. पाण्याअभावी शेती नाही आणि शेती नाही तर उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल नाही. उद्योगधंद्याना मोठ्या प्रमाणवर पाण्याची गरज भासते य्ताच्प्रमान्वे विजाही लागते पावसाअभावी हे सर्व उद्योगधंदे बाध पडतील. आणि याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणवर बेकारीची समस्या वाढेल. सर्व जीवनउपयोगी वस्तूंचा तुटवडा जाणवू लागेल.


        पावसाच्या पाण्यामुळेच सर्वत्र हिरवीगार वनराई आपल्याला पाहायला मिळते. गटाच्या चादरी पांघरलेले डोंगर, झुळझुळ वाहणारे झरे, उंचावरून फेसाळत खाली येणारे धबधबे किती मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळते. पाऊस पडलाच नाही, तर हे सारे निसर्गसौंदर्य लुप्त होईल सगळीकडे राख्राखत पाहायला मिळेल वाळवंटेच्या वाळवंटे तयार होतील. या सृष्टीच्या मनमोहक रुपाला मुकण्याची आपल्यावर वेळ येईल.


        आज पृथ्वीवर जी काही सजीवसृष्टी आहे ती फक्त आणि फक्त पाण्याच्या अस्तित्वामुळेच पाणी नसेल तर या पृथ्वीवर जगण्यासाठी काहीच साधन उपलब्ध होणार नाही. पाऊस आहे म्हणून पाणी आहे आणि या पाण्यामुळेच सारी सजीवसृष्टी अस्तित्वात आहे. पाणी हेच जीवन आहे. पाऊस पडलाच नाही तर.... हे कल्पना करण्यापुरते छान आहे पण प्रत्यक्षात मात्र पाऊस हा पडायलाच हवा.

 



हा निबंध लिहिताना तुम्ही खालील मुद्यांचा वापर निबंधात अवश्य करा.


[मुद्दे:

पाऊस नको वाटावा अशी घटना

पाऊस पडलाच नाही, तर पावसामुळे होणरी हानी टळेल

सर्व ठिकाणी पसरलेल्या चिखलाचा त्रास सहन करावा लागणार नाही.

रस्त्यांवर पाणी साचणे, गटारे तुंबणे यांसारख्या समस्या उद्भवणार नाहीत.

रोगराई पसरण्याचा धोका कमी होईल

पुराच्या पाण्यामुळे होणरी अपरिमित हानी टळेल

पावसाअभावी शेती नसेल

अन्नधान्याचे उत्पादन मिळणार नाही.

वीज गायब

शेती व उद्योगधंदे लुप्त होतील

सृष्टीच्या मनमोहक रुपाला मुकण्याची वेळ येईल

पाणी हेच जीवन आहे

पाऊस हा हवाच.]

 

 

मित्रांनो हा निबंध तुम्हीं खालीलप्रमाणे देखील शोधू शकता.


पाऊस पडलाच नाही तर...
पाऊस पडलाच नाही तर कल्पनात्मक निबंध
मराठी निबंध
पाऊस पडलाच नाही तर मराठी निबंध
Paus padlach nahi tar…
Paus padlach nahi tar kalpanatmak nibandh
Marathi nibandh
Paus padlach nahi tar Marathi nibandh
Essay on paus padlach nahi tar in Marathi.

 

 

धन्यवाद


Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.